जिल्ह्यात गुरुवारी होणाऱ्या महास्वच्छता अभियानात सर्वांनी सहभाग नोंदवावा - मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे आवाहन
- RightPost की खास रिपोर्ट (Exclusive Report).
- यह खबर जनता के सरोकार से जुड़ी है.
- पूरी खबर नीचे विस्तार से पढ़ें.
Join RightPost WhatsApp
Get latest news on phone!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)(मंगळवार, दिनांक 23 सप्टेंबर 2025): स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दरवर्षी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस "स्वच्छ भारत दिवस" म्हणून साजरा केला जातो. यंदा या मिशनला बळकटी देण्यासाठी "स्वच्छता ही सेवा" (SHS) मोहीम 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबवली जात आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने गुरुवार, दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यात "महाश्रमदान" अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात "एक दिवस, एक तास, एक साथ" या संकल्पने अंतर्गत सर्व शाळा, अंगणवाड्या, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, युवक, महिला व बचत गटांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी केले आहे.
"स्वच्छोत्सव" थीम अंतर्गत स्वच्छता मोहीम
यावर्षी "स्वच्छता ही सेवा 2025" मोहिमेसाठी "स्वच्छोत्सव" ही थीम निश्चित करण्यात आली आहे. या थीम अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. मोहिमेचा शुभारंभ 17 सप्टेंबर 2025 रोजी तालुका आणि गावस्तरावर परिसर स्वच्छता उपक्रम राबवून करण्यात आला. यामध्ये अस्वच्छ ठिकाणांचे मॅपिंग करून त्या ठिकाणांची स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे.
महास्वच्छता अभियान: 25 सप्टेंबर 2025
"एक दिवस, एक तास, एक साथ" या उपक्रमांतर्गत गुरुवार, 25 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये "महास्वच्छता अभियान" राबवले जाणार आहे. या अभियानात ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला, बचत गटांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि युवक सहभागी होणार आहेत. यामध्ये गावातील शाळा, अंगणवाड्या, शासकीय कार्यालये आणि परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. विशेषत: तुंबलेली गटारे वाहती करणे, पाण्याची डबकी साचणार नाहीत याची दक्षता घेणे यावर भर देण्यात येणार आहे.
साहित्य आणि व्यवस्थापन
या अभियानासाठी आवश्यक साहित्य जसे की झाडू, कचराकुंड्या, थैल्या, हातमोजे, मास्क, सॅनिटायझर, फावडे, घमेली आणि घंटागाडी यांचा पुरवठा ग्रामपंचायतीमार्फत केला जाणार आहे. गोळा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल आणि कचरा इतरत्र पडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी दिली.
सर्वांना सहभागाचे आवाहन
मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सर्वांना या अभियानात सहभागी होऊन स्वच्छ भारत मिशनला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छतेच्या या उत्सवात सहभागी होऊन आपले गाव, परिसर आणि देश स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
संपर्क:
पाणी व स्वच्छता विभाग,
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर
(या बातमीसाठी अधिक माहितीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांच्याशी संपर्क साधावा.)
न्यूज़ पेपर, टीवी व डिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.
ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.
आपकी प्रतिक्रिया क्या है?
आपकी प्रतिक्रिया क्या है?
पसंद करें
0
नापसंद
0
प्यार
0
मज़ेदार
0
गुस्सा
0
दुखद
0
वाह
0


स्कॅन करा




अपनी टिप्पणी छोड़ें...