"पाऊस कोसळतोय, शेतकरी रडतोय... सरकार ऐकणार का?

अतिवृष्टीची मदत नाही, आता अवकाळीने उरलेलंही हिरावलं! मुसळधार, ५०० हेक्टर मका-कापूस-तूर उद्ध्वस्त. अतिवृष्टी मदत शून्य, मराठवाडा अपडेट.

अक्टूबर 29, 2025 - 15:20
अक्टूबर 29, 2025 - 20:34
 0  51
"पाऊस कोसळतोय, शेतकरी रडतोय... सरकार ऐकणार का?
RightPost UPI QR स्कॅन करा

🙏 RightPost ला मदत करा!

न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.

UPI: stk-9834985191@okbizaxis

₹100 द्या

तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!

RightPost UPI QR स्कॅन करा

🙏 RightPost ला मदत करा!

न्यूज पोर्टल चालवणे खर्चिक आहे – सर्व्हर, लेखक, SEO...
तुमचे ₹50, ₹100 किंवा ₹500 चे योगदान
आम्हाला अधिक बातम्या, जलद अपडेट्स देण्यास मदत करेल.

UPI: stk-9834985191@okbizaxis

₹100 द्या

तुमचे नाव सपोर्टर्समध्ये!

rightpost news ad

रहीमपूर (छ.संभाजीनगर) | २९ ऑक्टोबर २०२५ | विशेष प्रतिनिधी : जमीर शेख 

गंगापूर तालुक्यातील रहीमपूर गाव आज पाण्याच्या तडाख्यात सापडलं. गेल्या ४८ तासांत सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळला. जुलैमध्ये दुष्काळाने जळालेली पिके, आता अवकाळी मुसळधाराने वाहून गेली. मका, कापूस, तूर – १००% उद्ध्वस्त. तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात एक पैसा मदत नाही!

शेतकऱ्यांचा हंबरडा : "उरलं तेही संपलं!"

रहीमपूरच्या शेतात उभे राहिले की फक्त पाणी, गाळ आणि निराशा दिसते. हारून शेख (३७) यांच्या २ एकर मक्याच्या शेतात आज सकाळी पाणी तुडुंब. कापणीसाठी दोन दिवस उरले होते.

"जुलैमध्ये पाऊस नव्हता, अर्धे पिके सुकली. आता कापणीला आलेली पिके पाण्यात गेली. अतिवृष्टी जाहीर झाली, पंचनामा झाला, पण पैसा आला नाही. कर्ज कसं फेडणार? मुलांचं शिक्षण कसं करणार? आम्ही रस्त्यावर उतरू!" – हारून शेख, शेतकरी

बाजूला गंडे पाटील (४८) यांचं कापूस शेत. पांढरा कापूस आता गाळाने माखलेला.

"१ एकर कापूस, १ एकर तूर – सगळं संपलं. बँकेत लाख कर्ज. घरात  लग्न. ५० हजार हेक्टरी तरी द्या, नाहीतर आत्महत्या करावी लागेल!" – गंडे पाटील, शेतकरी

तुर्काबाद, खराडी, अब्दुलपूर, लिंबे जळगाव, जिकठान – सर्व गावांचं चित्र एकच. शेतात कुजलेल्या , खराब झालेल्या पिकांपैकी काहीच वाचलं नाही. जमीन नापीक, गाळ साचला, रब्बी हंगामाची तयारीही धोक्यात.

सरकारची उदासीनता : मदत कुठे?

  • सप्टेंबर-ऑक्टोबर: राज्यात ३१ लाख शेतकऱ्यांना मदत जाहीर, पण अद्याप शून्य!
  • एकूण नुकसान: ५०० हेक्टर, ५ कोटी रुपये.
  • राज्यातील अवकाळी पावसाचा फटका: मराठवाड्यात कापूस, सोयाबीन, मका , तूर उद्ध्वस्त. पण मदत फक्त कागदावर!

 शेतकऱ्यांचा विश्वास उडाला. "आमचे पंचनामे कागदावरच राहिले!" असं गावकरी म्हणतात.

राजकीय खडाजंगी : आंदोलनाची हाक!

  • काँग्रेस-एनसीपी: रस्त्यावर उतरणार. "शिवसेना-बीजेपी सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी! नाहीतर तालुका बंद!"
  • भाजप: आश्वासन दिलं, पण कृती शून्य.
  • शेतकरी संघटना आक्रमक 

शेतकऱ्यांच्या मागण्या : आता तरी ऐकणार का?

  1. हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ मदत द्या 
  2. पीकविमा रक्कम १५ दिवसांत बँकेत जमा करा 
  3. रब्बी हंगामासाठी बियाणे, खते मोफत वाटप करा 
  4. सर्व कर्ज एक वर्ष स्थगित + व्याजमाफी द्या 
  5. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार हमी कामे द्या 

पुढे काय?.

  • शेतकरी संघटना आक्रमक कार्यालयावर मोर्चा.
  • रहीमपूरचे शेतकरी: "उरले-सुरलेही गेले. आता आम्ही काय करावे?

मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात. सरकार कधी जागं होणार?

जय जवान! जय किसान! 🇮🇳

ब्लॉगसाफ़र अॅड
ब्लॉगसाफ़र अॅड

न्यूज़ पेपर, टीवीडिजिटल मीडिया वर बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क करा. 9834985191. आपले हक्क आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्या पंचक्रोशीतील मीडिया शी संपर्क करा, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन द्या. तरच भ्रष्टाचार संपेल आणि भरभराटीचे दिवस येतील.

 ब्रेकिंग न्यूज, सरकारी व खासगी जॉब अपडेट, सरकारी योजना व इतर महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारातील लोकांना मिळण्यासाठी आमचा 9834985191 हा नंबर तुमच्या गावातील व् इतर् WhatsApp गृपमध्ये ॲड करा.

rightpost news ad

आपकी प्रतिक्रिया क्या है?

पसंद करें पसंद करें 0
नापसंद नापसंद 0
प्यार प्यार 0
मज़ेदार मज़ेदार 0
गुस्सा गुस्सा 0
दुखद दुखद 0
वाह वाह 0
ब्लॉगसाफ़र अॅड
ब्लॉगसाफ़र अॅड